‘कोणती पुण्ये अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे’
दूरदर्शनच्या नोकरीमुळे असंख्य प्रतिभावान कलावंत, लेखक, पत्रकार, समाजसेवक, राजकारणी, गायक, संगीतकार अशी विविध क्षेत्रांतली गुणी मित्रमंडळी भेटत गेली, त्यांचा सहवास लाभला. माणसांचं एक सुंदर शक्तिमान जग पाहण्याची आणि त्यांना वाचण्याची, समजून घेण्याची संधी मिळाली. मुख्य म्हणजे या गुणी आणि कर्तृत्वशाली मंडळींनी माझ्यातला लेखक, कलावंत हेरला, त्याला प्रोसाहन दिलं. माझी मलाच नव्याने ओळख करून दिली.......